माय मराठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत !!! मराठी भाषेतील शैक्षणिक व्यासपीठ असणाऱ्या या संकेतस्थळावर एकूण 2 मेनूबार आहेत. याखालील इमेजेसवर क्लिक केल्यास डायरेक्ट त्याच्या वेबसाईटवर नेले जाईल. त्याखालील मेनूबार हा Dropdown मेनूबार असून त्याखालील मेनूवर क्लिक केल्यास त्याखालील सबमेनू येतो व सबमेनूप्रमाणे माहितीस्थळ दर्शविले जाते.ब्लॉगवरील हवी ती माहिती शोधण्यासाठी डावीकडील स्लाइडबारच्या वर search पर्यायाचा वापर करा. ब्लॉगवर उपलब्ध अफाट माहिती विश्वातून आपणास हवी ती माहिती शोधून देण्यास ते मदत करते.
  • ①मुख्यपृष्ठ
  • ② डाउनलोड➠
  • ③ज्ञानरचनावाद➠
  • ④Online कार्यशाळा➠
  • ⑤Imp वेब्स➠
  • ⑥उपक्रमांचे जग➠
  • ⑦ई-लर्नींग/शै.ॲप्स➠
  • सुविचार 51 ते 100


    ५१) तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.
    ५२) शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याचा दुसरा पालकच.
    ५३) मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.
    ५४) आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.
    ५५) एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.
    ५६) परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी !
    ५७) खिडकी म्हणजे आकाश नसतं.
    ५८) जगण्यात मौज आहेच पण त्याहून अधिक मौज फ़ुलण्यात आहे
    ५९) वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन.
    ६०) भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचं फ़ूल कशासाठी जगायचं हे शिकवते.
    ६१) कविता म्हणजे भावनांचं चित्र!
    ६२) संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.
    ६३) तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच, किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल.
    ६४) ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव !
    ६५) स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका; आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका.
    ६६) अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.

    ६७) तुलना करावी पण अवहेलना करू नये.
    ६८) समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.
    ६९) आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.
    ७०) मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही.
    ७१) चेहरा हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो.
    ७२) व्यर्थ गोंष्टींची कारणे शोधू नका; आहे तो परिणाम स्वीकारा.
    ७३) आवडतं तेच करू नका; जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.
    ७४) तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
    ७५) अश्रु येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे.
    ७६) विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.
    ७७) मरण हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ नका.
    ७८) आयुष्यात प्रेम कारा ; पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.
    ७९) आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.
    ८० प्रायश्चित्तासारखी दूसरी शिक्षा नाही.
    ८१) तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा.
    ८२) सगळेच निर्णय मनाने घेऊ नका; काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.
    ८३) काळ्याकुट्ट रात्रीनंतर सुर्य उगवतोचं.
    ८४) लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहवं लागतं.
    ८५) चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते.
    ८६) तुमची उक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका.
    ८७) भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो; भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो.
    ८८) चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.
    ८९) आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा.
    ९०) उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही
    ९१) पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही.
    ९२) अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.
    ९३) मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो.
    ९४) रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय - मौन !
    ९५) अती अशा हे दुःखाचं मूळ कारण आहे.
    ९६) अंथरूण बघून पाय पसरा.
    ९७) कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत; ते मिळवावे लागतात.
    ९८) तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची माहिती नाही त्या विषयी मौन पाळा.
    ९९) अतिशहाणा त्याचा बैल रिकामा.
    १००) संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत आसताच.